पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
महापालिका आयुक्त अभिनव गोयल
कल्याण! पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी, जलसंवर्धनासाठी तसेच कचरा वर्गीकरणासाठी नागरिकांनी देखील पुढाकार घेऊन सहकार्य करावे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज कल्याण मधील उंबर्डे अमृत प्रकल्प येथे वृक्षारोपण करताना त्यांनी हे प्रतिपादन केले. याचवेळी त्यांनी उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प येथे मीयावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्याचा शुभारंभ केला ,महापालिका परीक्षेत्रात अन्य सहा ठिकाणी देखील अशी मियावाकी जंगले तयार केली जातील अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली.
आज देशी प्रजातीच्या सुमारे 3000 झाडांची लागवड केली आहे, यापुढे लोकसहभागातून वृक्षारोपण केले जाईल ,त्याचप्रमाणे "एक विद्यार्थी एक झाड "ही संकल्पना- ही ऍक्टिव्हिटी दर महिन्यात राबविण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक मुक्त शहर हे अभियानही आपल्याला राबवायचे आहे असेही आवाहन आयुक्त यांनी यावेळी केले.
या वृक्षारोपण अभियानात आमदार सुलभा गायकवाड तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी, एम एम आर डी ए चे अधीक्षक अभियंता, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, डॉ. प्रशांत पाटील उद्यान अधीक्षक अनिल तामोरे तसेच इतर अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी यांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला.
Most Popular News of this Week
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे...
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व...
